Posts

Showing posts from 2017

देव मनुष्यात आहे, माणसाच्या माणुसकीत आहे. त्यामुळं प्रत्येकांनी आपल्यात देव शोधावा...

बाबा आणि भक्तांची जोडगोडी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बघायला मिळते. अशात काही बाबांच सो कॉल्ड चमत्कारीक व्यक्तिमत्व भुरळ घालणारे असतात. किंबहुना त्यांना तसं प्रस्तुत केलं जात. सध्या देशात स्वतःला जगा समोर प्रेसेंट करण्याच वेगळच फ्याड आलंय. त्यामुळं अध्यात्माचा तिळमात्र संबंध नसलेले बाबा प्रेसेंटेन्शन आणि सेल्फमार्केटिंग मध्ये लागले आहे. सर्वच बाबा असे आहेत असं नाही, मात्र त्यांची संख्या कमी देखील नाहीच. मात्र, एखाद्या बाबाचं बिंग फुटल्या नंतर देखील भक्तांची बाबा प्रती असलेली श्रद्धा हि अंध आहे. आणि मग हीच अंधश्रद्धा हिंसेला प्रवृत्त करते. या हिंसेचे कदापिही समर्थन करता येणार नाही. मात्र, अशी स्थिती निर्माण होण्याला जवाबदार असलेल्या परिस्थिती नक्कीच विचार करायला भाग पाडते. एखाद्या बाबाचा अटके नंतर हिंसा होण्याची अनेक उदाहरण आहेत. मग संत रामपाल असो वा नुकतीच अटक झालेल्या गुरमीत राम रहीम च उदाहरण असो. यात हिंसेच्या घटनेत एक बाबतीत बरेच साम्य आहे. ते म्हणजे, हिंसेत झालेली जीवितहानी.. ज्यांनी आपले प्राण गमावले ते एकतर अंधश्रद्धाळू भावीक असतात किंवा भाविकांच्या हिंसेत आपले प्राण गमावणार
Image

पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तें इथंच, इथंच आहे, इथंच आहे.

  पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तें इथंच, इथंच आहे, इथंच आहे. असा उल्लेख कवितेत जम्मू-कश्मीर संदर्भात सापडतो. मात्र ,दहशतवाद, फुटीरतावाद्यांच्या समस्येने कायम काश्मीर ग्रासलेलं आहे. रोजगार नाही म्हणून काही पैस्यानं करीता युवक फुटिरतयवाद्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनवर दगडफेक करतात. अश्या स्थितीचा फायदा घेत वर्षोन वर्ष फुटीरतावादी गट अश्या युवकांना भरकटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इथल्या युवकांना टेररिझम नको तर टुरिझम हवय हे विद्यमान केंद्र सरकार ने चांगलं ओळखल्याचं दिसतय. आता कश्मीर कात टाकेलं असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र एखाद्या प्रदेशाचा जर विकास करायचा असेल तर दळणवळणाची साधने चांगली असावी अस बोलल जात. आता त्याच साधनांच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरचा विकास केला जातोय. उधमपूर येथील चेनाइ-नाशरी टनल हे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.      तसं जम्मूकश्मीर म्हंटल तर अगोदर समोर येतात उंच उंच अश्या हिमालय पर्वतरांगा. हे चित्र डोळ्यासमोर आलं की बर्फाची ओढ, थंड वातवरण व उंच पर्वत रांगा पर्यटकांना आपल्या कडे खुणावतात त्यामुळं इथं प्रत्येक मौसमात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. म

मोदींच मांडलिकत्व

     उत्तर प्रदेश हेच एक लक्ष ११ मार्च व नंतर पुढच्या राजकीय कारकिर्दी करीता मोदी आणि शहा यांच्या जोडीने ठेवले असावं किंबहुना आत्ता च्या राजकीय हालचाली वरून तसंच समीकरणा वरून हे चित्र सर्वसामन्यां समोर उभं राहत आहे. त्यातच  मोदींच्या सावलीने अर्थातच अमित शहा यांनी या पाच राज्यांच्या विशेषता उत्तर प्रदेशची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. कदाचित या निवडणुकीच्या निकाला नंतर अमित शहा यांचे दिल्लीतील वास्तव्य समोर देखील राहील (राष्ट्रीय अध्यक्ष पद)कि त्यांच्या कडे गुजरातची जबाबदारी येणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे या सर्व परिस्थिती अगोदर हवे तितके राज्य बादशाहच्या पदरी मांडलिकत्वाच्या संकल्पने नुसार टाकण्याचे कामाला शहा लागले असावेत.  आत्ता मांडलिकत्वाचा थेट संबंध इतिहासाशी आहे. तत्कालीन काही राजवटींनी मोगलांचे तसेच ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. संरक्षण पुरवण्याचे काम मांडलिकत्व स्वीकारणाऱ्या राजवटींना देण्याचे काम मोगल आणि ब्रिटिश करायचे असा काहीसा इतिहास आहे. या मांडलिकत्वाच्या निमित्याने मोगल आणि ब्रिटिश त्यांचा विस्थार करत. आत्ता अश्याच प्रकारचे मांडलिकत्व संपूर्ण द

चिन्नम्माची राजकीय एक्झिट

     मुख्यमंत्री बनण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शशिकला नटराजन यांचं स्वप्न तूर्तास भंगले आहे. मात्र,आपला विश्वासू चेहरा समोर करून अम्मांन नंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न आत्ता कारागृहात जाण्या अगोदर शशिकला (चिन्नम्मा) करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंगरुळु विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत उत्पन्ना हुन अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी चिन्नम्मा यांची चार वर्षांची शिक्षा कायम ठेवत १० कोटींचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय सध्या तामिळनाडूत सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमी वर आला आहे. त्यामुळे समोरच्या राजकीय डाव-पेच आखण्यात सर्व गट तयारी करत आहेत.एकत्र राहून अम्मांचं स्वप्न पूर्ण करू असे भावनिक आवाहन पन्नीरसेल्वम यांनी केले असले तरी पक्ष एकत्र राहील का असा गंभीर प्रश्न समोर निर्माण झाला आहे.       शशिकला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वा वरून ओ.पी ची हकालपट्टी केल्यामुळे राजकीय संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या विरोधात पक्षातील काही आमदार, खासदार तसेच पदाधिकारी पन्नीरसेल्वम यांच्या गोटात दाखल झाले आहे. विधिमंडळ नेते पदी श

. . . . . . . . . अखेर ओ.पीं च्या मुखातून बंडाचा 'ओ'

    हो मॅडम, हो सर,पक्षाचा आदेश सर्वमान्य,भाऊ बोले तैसा चाले. जनतेने निवडणून दिलेल्या नेत्यांना 'त्यांच्या नेत्यांचे' आदेश पाळावे लागतात. हे 'सर्वश्रुत' आहे. मात्र आदेश न पाळल्या नंतर कसा 'राजकीय भूकंप' होतो याचे एक ताज उदाहरण तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती वरून बघायला मिळत आहे. केवळ एका 'ओ' ने कसे राजकीय समीकरणे बदलू शकतात याचे हे उदाहरण.अर्थातच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते  शशिकला (चिन्नम्मा) विरुद्ध ओ.पन्नीरसेल्वम (ओ.पीं)  च्या राजकीय रस्सीखेच कडे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय इच्छा शक्ती जागी झाल्यामुळे ओ.पन्नीरसेल्वम यांनी पक्षाच्या महासचिव आणि विधिमंडळ दलाच्या नेत्या चिन्नम्मा विरोधात उघड बंड केला. त्यात विरोधकांची फूस देखील असू शकते. मात्र अगोदर पासून व्यक्तीपूजेत अग्रेसर असलेल्या तामिळनाडूच्या जनतेला 'इमोशनल' करून राजकारण सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जयललिता यांच्या विश्वासू (एके काळी जयललितांचा विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली पक्षातून काढलेल्या) चिन्नम्मा या सत्ता केंद्र होऊ बघत आहेत. अम्माच्या निधना नंतर ओ.पी क